नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Wednesday, May 28, 2025

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत."पद्मश्री" पोस्टाने पाठवा साहेब..!!

 



दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत."पद्मश्री" पोस्टाने पाठवा साहेब..!!


शिक्षण फक्त तिसरी पास... नक्कीच वाचा..


ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !

त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,

दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत

"पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.

कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,

कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.

आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.

साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .

हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय.

ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन - पेन्सिल - शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत "राम शबरी" सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मश्री" पुरस्कार जाहीर झाला.

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.

त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. "सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत" अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो..... रडायच नाही

तर लढायच आणि लढून जिंकायच..

Saturday, March 29, 2025

बेलदारवाडी शाळेचे समृद्धी परीक्षेत यश


जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा शाळेतील मुलांनी समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत उज्वल यश मिळवले.शाळेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. दुसरीमधील रुद्रांश सुधीर बिळासकर याने ९४ गुण मिळवून शिराळा केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. तिसरीमधील राजवी राजाराम काटवटे हिनेदेखील १८० गुण मिळवून शिराळा केंद्रात व्दितीय क्रमांक मिळवला.तर दुसरीमधील साईराज चंद्रकांत शेवाळे याने ९० गुण मिळवून शिराळा केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. या परीक्षेत वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर, शौर्य बाळासो बिळासकर , रिद्धी संदीप मस्कर , आयुष अमोल महाडिक , अनुष्का चंद्रकांत शेवाळे , आरोही सुहास मस्कर , देवराज अमोल शेटके , रोहन बाळासो बिळासकर , ओम तानाजी मस्कर , आरोही शंकर जाधव व सोहम शिवाजी मस्कर या विद्यार्थिनी या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राजाराम काटवटे सर व तानाजी कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.








Sunday, March 23, 2025

बेलदारवाडी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट

 बेलदारवाडी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट


जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता. शिराळा येथे मुंबई येथील उद्योजक श्री.शशिकांत डुंगरशी वीरा , श्री.जिगर शशिकांत वीरा , श्री.जयेश श्रीकृष्ण कदम आणि श्री.शहाजी विष्णू मस्कर यांच्यावतीने शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.त्यांना पाहुण्यांकडून खाऊ वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर ,उपसरपंच सौ लक्ष्मी बाबासो शेवाळे , रिटायर्ड फौजी श्री. आविनाश विलास शेवाळे , श्रीम.सोनाबाई विष्णू मस्कर , श्री.विकास शेटके , श्री.बाबासो शेवाळे , श्री. प्रकाश शेवाळे , अंगणवाडी मदतनीस सौ.संगीता शेवाळे , उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट दिल्याबद्दल आभार मानले.




















Wednesday, October 2, 2024

बेलदारवाडी येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी



 आज ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर आणि उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या फोटोचे प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर मुलांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा माहितीपर व्हिडिओ संगणकावर दाखवण्यात आला. त्यानंतर मुलांची भाषणे झाली. यामध्ये अनुष्का चंद्रकांत शेवाळे ,  सोहम शिवाजी मस्कर ,  देवराज अमोल शेटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी दोन्ही नेत्यांची माहिती सांगितली. यावेळी सरपंच सौ.योगिता बिळासकर, उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर , उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , ग्रामपंचायत कर्मचारी विजय तटले उपस्थित होते.शेवटी श्री.राजाराम काटवटे सर यांनी आभार मानले.

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना विद्यार्थी

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना विद्यार्थिनी
सोहम शिवाजी मस्कर 
देवराज अमोल शेटके
सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर 
उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे
राजाराम काटवटे सर
अनुष्का चंद्रकांत शेवाळे
मुख्याध्यापक तानाजी कदम सर

Tuesday, September 3, 2024

परिसर भेट


 📙🌴📙🌳📙🌴📙🌳

📘🌲📘🌲📘🌲📘🌲

*आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी मधील विद्यार्थी व शिक्षक यांनी परिसर अभ्यास या विषयांतर्गत परिसर भेट दिली.या अंतर्गत शेततळे , छोटा तलाव , शेतातील पीके - सोयाबीन , स्टोन क्रशर यांना भेट दिली. शेततळे कसे तयार केले जाते याची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.तर बांध घालून पाणी कसे अडवले जाते ते ही पाहिले. त्यानंतर मुलांनी स्टोन क्रशर ला भेट दिली. स्टोन क्रशरचे काम नक्की कसे चालते डोंगर फोडून दगडाचे तुकडे जेसीबीच्या साहाय्याने गोळा केले जातात. दगड डंपरद्वारे डोंगरातून आणल्यानंतर त्याची खडी व वाळू / ग्रीड कशी तयार केली जाते , यासाठी कोणकोणत्या मशिनी लागतात त्यांची प्रत्यक्ष पाहणी मुलांनी केली.निसर्ग भेटीत निसर्गाचे निरीक्षण करताना निसर्गाचाच एक महत्वाचा घटक तो म्हणजे पाऊस.या पावसावर सर्व निसर्ग अवलंबून असतो त्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी या परिसर भेटीत पावसानेही अचानक हजेरी लावली. त्यामुळे मुलेही थोडी भिजली.पाऊस सोडला तर ही परिसर भेट खूप छान अशी झाली मुलांना तिसरीमध्ये परिसर अभ्यास या विषयात पाणी नक्की येते कोठून हा पाठ आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.मुलांनी सर्वांचा मनमुरादपणे आनंद घेतला.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे*

🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️



Monday, August 26, 2024

बेलदारवाडी शाळेस शालेय साहित्य भेट

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

आज सोमवार दि.२६.०८.२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे समीक्षा ( राधा ) शहाजी मस्कर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबियांकडून शाळेतील व अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना २५०० रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना ४ विविध प्रकारच्या वह्या , रंगीत खडू व लेखन साहित्य भेट देण्यात आले तर अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना पाटी व अंकलिपी भेट देण्यात आली.यावेळी शहाजी मस्कर यांच्या आई सोनाबाई विष्णू मस्कर यांच्या हस्ते सर्व मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप मस्कर , चंद्रकांत शेवाळे , कुमार बोंगे , नम्रता मस्कर , आदित्य मस्कर , मुख्याध्यापक तानाजी कदम सर , शिक्षक राजाराम काटवटे, अंगणवाडी सेविका संगीता शेवाळे उपस्थित होत्या.शहाजी विष्णू मस्कर यांनी आपल्या गावातील शाळेस व अंगणवाडीला केलेल्या अनमोल मदतीबद्दल शाळेच्या वतीने खूप खूप आभार.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼