नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Friday, August 23, 2024

संघर्ष




 “1980 मध्ये, रिचर्ड नावाच्या माणसाने आपला टेलिव्हिजन चालू केला आणि रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर $ 40,000 चा धनादेश प्राप्त करताना पाहिले. 

 हे संपूर्ण दृश्य रिचर्डला धक्का देण्यासाठी पुरेसे होते. हे त्याच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी जास्त होते. 


 काही वर्षातच, त्याने ठरवले की त्याच्या तरुण मुली देखील टेनिस खेळतील.


 टेलिव्हिजन बंद केल्यानंतर, तो खाली बसला आणि त्याने 78-पानांचा एक दस्तऐवज लिहिला ज्यामध्ये त्याच्या दोन तरुण मुलींनी त्यांच्या मूळ गावी कॉम्प्टन, कॅलिफोर्निया, कुख्यात कृष्णवर्णीय गुंड हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातून पळून जाण्याची योजना आखली.

 पण एक अडचण अशीही होती की रिचर्डला टेनिसबद्दल काहीच माहीत नव्हते, या महागड्या खेळासाठी आपल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि कदाचित आपल्यासाठी हे अविश्वसनीय आहे की त्याच्या मुलींचा जन्मही झाला नाही. त्या वेळी.


 पुढील पाच वर्षांत त्यांनी टेनिसशी संबंधित मासिके आणि व्हिडिओ कॅसेट्स गोळा केल्या. त्याने स्वतःला टेनिस खेळायलाही शिकवले. पाच वर्षांनंतर, त्याच्या योजनेनुसार, रिचर्डने त्याच्या दोन मुलींच्या हातात टेनिस रॅकेट, तीच मासिके आणि व्हिडिओ आणि त्यांच्याकडून काय शिकले होते.


 आता या लहान मुलींचे वडील आणि प्रशिक्षक तेच त्यांना टेनिस खेळ शिकवू लागले.


 गरीब रिचर्ड कधीकधी स्थानिक कंट्री क्लबमध्ये जाऊन डब्यातून वापरलेले टेनिस बॉल गोळा करून शॉपिंग कार्टमध्ये लोड करायचे, जेणेकरून त्याच्या मुलींना त्यांच्यासोबत सार्वजनिक टेनिस कोर्टवर सराव करता येईल, कारण तो त्यांच्यासाठी मूलभूत गोष्टी घेऊ शकत नव्हता.


 तो एक वडील म्हणून अतिसंरक्षणात्मक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होता, आणि प्रशिक्षणादरम्यान आपल्या मुलींना छळापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना स्थानिक टोळीच्या गुंडांकडून अनेकदा मारहाण केली जात असे. एकदा जेव्हा त्याने आपल्या मुलींसह सराव कोर्ट सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी त्याचे नाक, जबडा आणि बोटे तोडली आणि त्याचे अनेक दात काढले. 


 रिचर्ड आपल्या मुलींसह घरी आला, त्याची डायरी उघडली आणि लिहिले: "आजनंतर, इतिहास 'दंतहीन' माणसाला धैर्याचे स्मारक म्हणून लक्षात ठेवेल."


 त्यावेळी टेनिस हा प्रामुख्याने पांढरा खेळ असल्याने, रिचर्ड आणि त्याच्या मुली ज्युनियर स्पर्धांसाठी विविध टेनिस कोर्टवर जात असताना लोक कृष्णवर्णीय कुटुंबाकडे बघत आणि ओरडायचे. 


 एकदा मुलींनी विचारले, "बाबा, लोक आमच्याकडे इतक्या वाईट नजरेने का पाहतात," त्याने उत्तर दिले, "कारण त्यांना पूर्वी इतके सुंदर लोक पाहण्याची सवय नव्हती."


 काळाचे चक्र झपाट्याने फिरले आणि कॅलेंडरचे पान 2000 सालापर्यंत झपाट्याने वळले, जेव्हा एक उंच, दुबळी काळी मुलगी विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी प्रवासाला निघाली होती आणि तिच्या मूळ वस्तीपासून हजारो मैल दूर, रिचर्डने त्याचे दृश्य पाहिले. मोठी मुलगी लंडनच्या उच्चभ्रू, सेलिब्रिटी आणि रॉयल्टीसमोर गवतावर खेळते.


 हा तो काळ होता जेव्हा एवढी ताकदवान सर्व्हिस आणि वेगवान फूटवर्क असलेला टेनिसपटू कोणीही पाहिला नव्हता किंवा इतक्या जोरात शॉट्स कधी ऐकले नव्हते.

 जणू प्रत्येक बॉल मारला जात आहे आणि प्रत्येक चेंडू वेदनांनी ओरडत आहे कारण ती जोमाने खेळली आहे.


 जेव्हा मुलगी अशा टप्प्यावर पोहोचली जिथे विजय भीतीच्या पुढे होता, तेव्हा मुलीने स्टँडवर उभ्या असलेल्या तिच्या वडिलांकडे पाहिले जे तिला मोठ्याने ओरडून विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत होते, कारण तो नेहमी आपल्या मुलींना सांगतो की, "एक दिवस, आम्ही विम्बल्डन जिंकणार आहे, आणि ते अमेरिकेतील असहाय आणि गरीब लोकांसाठी असेल.


 रिचर्डची 20 वर्षांची संघर्ष योजना आता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली होती.


 प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटवर आदळताच, कॅमेऱ्यांनी रडवलेल्या डोळ्यांनी रिचर्डला बेधुंदपणे नाचताना त्याची मुलगी व्हीनस विल्यम्सला तिच्या सात ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी पहिले विजेतेपद जिंकताना पाहिले. पुढील अनेक वर्षांमध्ये, रिचर्डने त्याची सर्वात धाकटी मुलगी सेरेना विल्यम्सला 23 मोठ्या स्पर्धा जिंकताना आणि टेनिसमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक बनताना पाहिले.


 टेनिस कोर्टवरील त्यांच्या सर्व यशासाठी, व्हीनस आणि सेरेना यांनी कोर्टवर जे सहन केले ते त्यांच्या वडिलांच्या प्रवासातील सर्वात प्रभावी भाग आहे.”...

Wednesday, August 21, 2024

बेलदारवाडी येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात



 जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.






Thursday, August 15, 2024

बेलदारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

बेलदारवाडी येथे झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा क्षणरुपी व्हिडिओ पाहण्यासाठी वर क्लिक करा.



🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


*आज गुरुवार दिनांक १५.०८.२०२४ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे हर घर तिरंगा अभियानअंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण अंगणवाडी सेविका सौ.विजया मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप विश्वास मस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमात त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणाचा कार्यक्रम झाला.त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विविध परीक्षेत व स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व शिल्ड देऊन अभिनंदन करण्यात आले.दुसरी मधील रुद्रांश सुधीर बिळासकर याने पहिलीमध्ये सांगली जिल्हा गुणवत्ता चाचणी मध्ये १०० पैकी ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळविला तसेच समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ९० गुण मिळवून केंद्रात तिसरा क्रमांक मिळविल्या बद्दल रुद्रांशचे उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे यांच्या हस्ते शिल्ड व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन करण्यात आले.तर तिसरीमधील राजवी राजाराम काटवटे हिने दुसरीमध्ये सांगली जिल्हा गुणवत्ता चाचणी मध्ये १०० पैकी ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळविला तसेच समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ९८ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला तसेच मंथन परीक्षेत केंद्रात तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल राजवीचे सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर व CRC अध्यक्ष वैशाली बोंगे यांच्या हस्ते शिल्ड व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर रिद्धी मस्कर , साईराज शेवाळे , वेदांतिका बिळासकर यांनाही विविध मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले. बेलदारवाडी गावातील श्री सागर भांडवले यांची तलाठी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.शंकर जाधव यांनी शाळेला २००० रुपयांची भेट दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले*


*शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध मान्यवरांकडून बिस्कीट , चॉकलेट , जिलेबी वगैरे विविध खाऊ मिळाला.त्याचे वाटप करण्यात आले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची  बेलदारवाडी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी वाटेत मुलांना चॉकलेट वगैरे खाऊ दिला त्याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने आभार*


 *सदर कार्यक्रमासाठी सरपंच सौ योगिता सुधीर बिळासकर , उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा तानाजी मदने ,  ग्रामपंचायत सदस्या जयश्री हंबीरराव शेवाळे, ग्रामपंचायत सदस्या राजश्री आनंदा शेवाळे , पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , CRC अध्यक्ष वैशाली बोंगे , आशा सेविका सौ.सुजाता शेवाळे SMC अध्यक्ष श्री.संदिप मस्कर , SMC उपाध्यक्ष श्री.शंकर जाधव , सुधीर बिळासकर , शिवाजी मस्कर , तानाजी मदने , सुहास मस्कर , बाबासो मस्कर बाबासो शेवाळे , बाळासो बिळासकर, कुमार बोंगे यांच्या बरोबर शाळेतील शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳





























Saturday, July 20, 2024

बेलदारवाडी येथे बालदिंडी सोहळा उत्साहात साजरा



ज्ञानोबा माऊली तुकाराम

ज्ञानोबा माऊली तुकाराम 


                या जयघोषात जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा मधील विद्यार्थ्यांचा बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. बेलदारवाडी गावामधील शाळेपासून ही दिंडी सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माऊलींच्या जयघोषाने परिसर दमदमून गेला.गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण घातले.मुलांनी फुगड्या घातल्या.या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यानंतर हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांची बालदिंडी परत निघाली.यावेळी शंकर जाधव आणि शिवाजी मस्कर यांनी छोट्या वारकऱ्यांना खाऊ वाटप केला.सदर दिंडीमध्ये उपसरपंच लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्या मनिषा मदने ,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप मस्कर , पालक अमोल शेटके , कुमार बोंगे , शिवाजी मस्कर संगीता शेवाळे , मुख्याध्यापक तानाजी कदम , शिक्षक राजाराम काटवटे, तसेच इतर पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.


व्हिडिओ खाली क्लिक करून पाहू शकाल.




बेलदारवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत



वैराग्यमूर्ती दिनांक 20.7.2024

सांगली जिल्हा गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडीमधील शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले. पहिलीमधील रुद्रांश सुधीर बिळासकर याने ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळवला.तर दुसरीमधील राजवी राजाराम काटवटे हिनेदेखील ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळविला. यांच्याबरोबर पहिलीमधील वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर , शौर्य बाळासो बिळासकर , साईराज चंद्रकांत शेवाळे , स्वरा रमेश पाटील यांनी तर दुसरीमधील रिद्धी संदिप मस्कर या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.सदर विदयार्थ्यांना वर्गशिक्षक श्री.राजाराम प्रकाश काटवटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप विश्वास मस्कर , उपाध्यक्ष श्री.शंकर किसन जाधव , मुख्याध्यापक तानाजी कदम , तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले.


दैनिक वाळवा क्रांती दिनांक 20.7.2024



सकाळ दिनांक 21.7.2024







Saturday, June 29, 2024

अभिनंदनीय निवड

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*🌹🌹अभिनंदनीय निवड🌹🌹*

               *आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे झालेल्या  पालक मीटिंगमध्ये शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांची पूर्नरचना करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी _श्री.संदिप विश्वास मस्कर_ व उपाध्यक्ष पदी _श्री.शंकर किसन जाधव_ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

               *शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष पदी _श्री.विकास जोतिराम शेटके_ यांची तर माता पालक संघाच्या अध्यक्षपदी _सौ.सुजाता चंद्रकांत शेवाळे_ यांची निवड करण्यात आली.सदर पालक मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मीटिंगमध्ये  श्री.सुधीर बिळासकर, श्री चंद्रकांत शेवाळे ,श्री.शिवाजी मस्कर , श्री.बाळासो बिळासकर , श्री बाबासो शेवाळे , सौ.जयश्री शेवाळे ,सौ उज्वला मस्कर, सौ.कविता जाधव , सौ.रोहिणी शेटके , सौ.संजीवनी शेटके , पूर्वा बिळासकर अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील मॅडम , शिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते.*









शाळा व्यवस्थापन समिती


शिक्षक पालक संघ


माता पालक संघ





Monday, May 20, 2024

आकाशात झेपावलेली पाखरे २० वर्षानंतर परतली घरट्यात

 


२० वर्षानंतर आकाशात झेपावलेली पाखरे परतली घरट्यात


दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा    
 मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ...

                                   कवी अनंत राऊत लिखित मैत्री विषयीच्या कवितेतील ओळींचा पुरेपूर अनुभव आज स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्व मित्रांना आला.निमित्त होते आझाद विद्यालय कासेगाव तालुका वाळवा येथून २००३-०४ मध्ये बाहेर पडलेल्या मित्रांचा माजी विद्यार्थी मेळावा.रविवार दि.१९.०५.२०२४ रोजी आझाद विद्यालय कासेगाव येथे २० वर्षांपूर्वीच्या मित्रांचा माजी विद्यार्थी मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.
                          सर्वप्रथम हलगीच्या निनादात सर्व गुरूंचे आणि विद्यार्थ्यांचे आगमन झाले.त्यानंतर सर्वांनी मैदानात असलेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.आडके सर यांच्या हस्ते शालेय परिसरामध्ये रोप लावून कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर सर्वजण शाळेतील वर्गात आले.

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.सुभाष आडके सर आणि श्री. एम.जे. पाटील सर व इतर मान्यवरांच्या हस्ते  लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या जुन्या शिक्षकांचे रोप आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

उत्सव हा मैत्रीचा ..
उत्सव हा पुर्नभेटीचा ...
उत्सव हा जुन्या आठवणी जागविण्याचा ....

                             सर्व विद्यार्थ्यांनी सध्या कोण काय करत आहे याविषयी सांगितले.मिलिंद सुतार , राजाराम काटवटे  व माधुरी पाटील यांनी आपल्या शाळेविषयी आणि आपल्या गुरुविषयींच्या आठवणी जाग्या केल्या.कोण इंजिनिअर झाले तर कोण डॉक्टर झाले , कोण पोलीस झाले तर कोण सैनिक झाले , कोण पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले तर कोण शिक्षक झाले , कोण बिझनेस करते तर कोण शेती करतो पण स्वत:च्या पायावर सर्वजण उभे राहिलो कारण होती फक्त आणि फक्त ही आझाद विद्यालय कासेगावची शाळा.
       
                                         यानंतर शाळेत कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी सर्वांना उपदेशपर मार्गदर्शन केले.हिंदी विषयासाठी अध्यापन करणारे श्री.जे.बी.काळे सर यांनी मंदिरात मदत करण्या ऐवजी आपल्या शाळेस मदत करावी जेणेकरून जी मुले गरीब आहेत त्याचा त्यांना फायदा होईल असे सांगितले. विज्ञान विषयासाठी अध्यापन करणारे श्री.बी.एस.पाटील सर यांनी आपल्या आई - वडिलांना कधीच विसरू नका असे सांगितले.यानंतर भूगोल विषयाचे माजी शिक्षक श्री.एम. जे.पाटील सर  , शारीरिक शिक्षण विषयाचे श्री.जे.आर.पाटील सर , चित्रकलेचे गुरव सर यांनी सर्वाना मार्गदर्शन केले .यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.आडके सर यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ते लक्षात ठेवून ज्या क्षेत्रात आहात तेथे प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्या शाळेस मदत करण्याचे आवाहन केले.यावेळी  श्री. एच.एस.पाटील सर ,श्री. एस.आर.गोंदील सर आणि मोरे सर उपस्थित होते. १० वी बॅच २००३-०४ च्या वतीने शाळेस बास्केटबॉल संच भेट देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सुयोग गावडे यांनी अतिशय सुंदर केले.
शाळेत झालेल्या या कार्यक्रमानंतर कृष्णाकाठ ॲग्रो  रिसाॅर्ट तांबवे - बहे येथे पुढील कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी रवाना झाले.तेथे स्वरांगण ग्रुप कराड येथील कलाकारांनी संगीताचा बहारदार कार्यक्रम पेश केला .आणि मित्रांच्या जुन्या खेळांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी विविध Funny Games घेण्यात आले.तळ्यात मळ्यात , फुगा फुगविणे , तो फुगा दोन्ही पायांच्या मध्ये धरून उड्या मारणे , फुगा फोडणे यासारखे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यामध्ये सर्व मित्रमंडळीना खूप आनंद आला. ‌त्यानंतर उपस्थित  सर्वाना स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून स्मृतीचिन्ह देण्यात आले. 









Funny Game 🎯🎯🎯

                                           Funny Games झाल्यानंतर दुपारची सुट्टी करण्यात आली म्हणजेच सर्व शिक्षक आणि मित्रमंडळी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण विविध गप्पामध्ये रमले.यावेळी सर्वांनी कृष्णा नदीत आपल्या सवंगड्यांसह बोटिंगचा आनंद घेतला.मैत्रिणी एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे आठवण म्हणून सेल्फी घेत होत्या.तर कोणी झोपाळ्यावर गप्पा मारत जुन्या आठवणी जागे करत होते.
हळूहळू निरोपाचा क्षण जवळ येत होता पण सर्वांचे पाय काही जाग्याहून हलत नव्हते.तरीपण नाईलाज म्हणून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा असेच एक दिवस भेटण्याचे वचन देऊनच.
खरच आपल्याला पूर्वी जगलेले दिवस पुन्हा जगता आले असते तर किती बरे झाले असते.
मित्रांचे जीवनातील स्थान खूप महत्वाचे असतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते हे घट्ट आणि अखंड असते.याचा अनुभव या निमित्ताने आला.
                                            सदर गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी मुलांमधून स्वप्नील पाटील , सुयोग गावडे , विकास सुतार , संदिप रामणे , माणिक गावडे , कोंडीबा शेंडगे , विशाल माने , राजेंद्र शिंदे , सिद्धेश्वर शिंदे , संजय माळी यांनी तर मुलींमधून माधुरी पाटील , श्वेताली पाटील , मंदाकिनी पाटील , अर्चना सन्मुख , रेणुका सुतार , सुजाता शिणगारे , रुपाली शिणगारे यांनी विशेषतः खूप प्रयत्न केले.तसेच जे ज्ञात अज्ञात मित्र मंडळी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यामुळे त्यांना माझ्याकडून आणि आझाद १० वी बॅच २००३-०४ कडून मनपूर्वक धन्यवाद तुमच्यामुळेच आज आम्ही मित्र मंडळीना पुन्हा भेटू शकलो.
                                          आज या कार्यक्रमात इंजिनिअर असलेले सुयोग गावडे ,  बिझनेसमन असलेले  स्वप्नील पाटील , विकास सुतार , संदिप रामणे विशाल गावडे , मिलिंद सुतार , डॉक्टर माणिक गावडे , डॉ.राजेंद्र शिंदे  , पाटबंधारे खात्यात कार्यरत कोंडीबा शेंडगे , पुण्यात कंपनी मध्ये मॅनेजर पदी असणारा आदित्य वाघावकर ,छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यरत इंजिनिअर प्रमोद यादव , पोलीसमध्ये कार्यरत असलेले माणिक पाटील , संग्राम पाटील , रोहित कुंभार  ,  Army मध्ये कार्यरत प्रशांत रणदिवे , Para Militery मध्ये कार्यरत अविनाश चव्हाण ,  पुण्यात महिंद्र कंपनीत कार्यरत अमोल पाटील , आणि प्रमोद जंगम / बंडा , कबड्डीपट्टू म्हणून नावाजलेले काशिलिंग आडके आणि अमोल ठोंबरे तसेच   , वनविभागामध्ये कार्यरत  संजय माळी , इस्लामपूर आगारात कार्यरत असणारा सुनिल मोहिते , , Tractor Garrage असलेला  प्रदीप  माळी  ,सोने चांदी व्यावसायिक प्रशांत पोतदार , कासेगाव मध्ये छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांची जयंती भव्य दिव्य साजरी करण्यात मोलाचा हात असणारा  आभिजीत पाटील , कॉम्पुटर मध्ये तज्ञ विश्वनाथ देसाई , प्रगतशील शेतकरी विशाल माने , संग्राम  माळी , प्रशांत पाटील , अरुण डबाणे  यांना भेटून छान वाटले.तर मुलींमधून माधुरी पाटील , श्वेताली पाटील , मंदाकिनी पाटील ,सुरेखा माळी , सविता माळी , आश्विनी पाटील , रेणुका सुतार , रुपाली पाटील , स्वाती शिनगारे , स्वाती सावंत , जयवंती पाटील ,  पुजा माने , परवीन मुल्ला , अर्चना परीट , प्रतिभा जगताप , उषा व प्रतिभा मोरे , अर्चना सन्मुख , लता भालकर तसेच अनेक मुली उपस्थित होत्या .सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आनंद वाटला. 
                                          तसेच या कार्यक्रमासाठी यायची खूप इच्छा असून सुद्धा ARMY मध्ये असून रजा न मिळाल्याने येऊ न शकलेले रामचंद्र कराडे , दत्तात्रय पाटील , मुंबईमध्ये इलेक्शन ड्युटी लागल्याने येऊ न शकलेला विनायक पाटील , तसेच मुंबईतून येऊ न शकलेला सिद्धेश्वर शिंदे  , वासिम आत्तार , स्वप्नील गावडे , योगेश मदने , जमीर शेख  , सुधीर देसाई , सुनील कुंभार , अमृत कुंभार , अतुल निकम , उद्धव शिद , सागर वगरे , सागर कांबळे , अविनाश कांबळे , विनोद  कांबळे , जयंत माने , परशुराम माळी , संतोष आडके / गणा  , प्रविण आडके , जमीर शेख , महादेव जाधव या मित्रांची  कमतरता आज जाणवली.तुम्ही सर्वजण असता तर नक्कीच आम्हाला आणखी खूप चांगले वाटले असते.
                                                  वीस वर्षानंतर झालेल्या मित्रांच्या या भेटीचा आनंद अवर्णनीय आहे.मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट असते.मैत्रीचा धागा हा कायम मनात विणला जातो.स्नेह मेळाव्याचा कालचा हा दिवस असाच माझ्या मनामध्ये कायम आठवणी देत जाईल.शेवटी इथेच थांबतो.पुन्हा भेटूया नंतर कधीतरी.


आपलाच
प्राथमिक शिक्षक झालेला मित्र 
श्री. राजाराम प्रकाश काटवटे 
जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता. शिराळा 
मोबाईल क्रमांक - 9890943956